जगणं डोंगरांच !!!

मार्च 1, 2011 at 8:26 pm 4 comments

जळती डोंगरं बघितली का माझं मन अगदी भकास होऊन जातं..सताड डोळ्यांन वरती देवाकड बघत असल्यासारखं ……ह्याचं रूप!!!!

दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस लागले की डोंगरांचं जगणं बघितलं की मन मन उदास होऊन जातं….कुठे पेटवून दिलेली डोंगर तर कुठे आपो-आपोआपच उन्हानं भाजलेली डोंगर….लहानपणी दूर कुठेतरी संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला की,डोंगरावर लाल-भडक जाळ दिसला की डोंगराला आग लागली असं वाटायचं..पण नंतर कळायला लागली की आग लागत नसे,ती लावली जायची…..डोंगरावरचं सारं वाळलेले गवत,पाला-पाचोळा,काटे-कुटे जाळून टाकायची…….चैत्राचा महिन्यात जिथे नुकतीच पालवी फुटलेली झाडं आहेत ती पण ह्या आगीत होरपळून निघणारी….

पावसाळ्यात ह्याच डोंगराचं रुपडं बघितलं का मन कसा हरखून जातं..

….सारा डोंगर परत हिरवागार……….सगळी प्राणी,पाखरं,फुलपाखरं,मनसोक्त जीवन जगणार….फुलपाखरं आनंदान ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला तयार…..पाखर आपापली घरट बांधून पिल्लं वाढवणार……शेतकऱ्यांचे जनावराची डोंगरावरच्या गवताना पोटं फुगणार……. अख्खा पावसाळा हा डोंगर कसा हिरवागार झाडा-झुडपांनी सजलेला….खारुताई इकडून तिकडे उड्या मारणार…लहान लहान किडे,मुंग्या-मुंगळे आपला निवारा करणार..मोरांचे नाचणं पावसाच्या सरीवर पडताना…..धो-धो वाहणारे धबधबे…..पावसाच्या पाण्याला वाट करून देणारं डोंगर…..वाटलंच तर स्वतःला खाच-खळगे करून घेण…सगळ काही भरभरून देणारा..आपल्याजवळ असणार सगळ देणारा..अगदी किड्या-मुंगीपासून अगदी माणूस प्राण्यापर्यंत सगळ्यांना भरभरून देणारा…….अश्या वेळी मनाला प्रश्न पडतो….एवढ्या डोंगराळ,खडकात कुठून एवढा गवत-गबाळाच बी पडतं कुणास ठाऊक……सगळी जमात कशी आनंदानं जगतात……..अगदी ६-७  महिन्याचेच जगणं म्हणाव ह्या डोंगरांच …पावसाळ्याचे ३-४ महिने अन् हिवाळ्याचे २-३ महिने……पण ह्या ६-७ महिन्यातच  भरभरून देण ….बाकी उन्हाळा लागला की मग मात्र हीचं डोंगर जाळली जातात, नाहीतर उन्हानं अंगाची लाही लाही होऊन पुरती भाजून तरी जातात…….आतापर्यंत अंग-खांद्यावर नाचणारी पक्षी, बागडणारे फुलपाखर, डोंगराच्या खुशीत येऊ राहणारी नाना-तऱ्हेचे किडे,मुंगळे अन् मुंग्या कुठतरी हरवून जातात, पाखरांनी केलेली घरट रिकामी, ओस पडलेली…त्यांची पिल्लंही उडून गेलेली……….झाडही एकतर करपून गेलेली नाहीतर जाळून खाक झालेली…दरवर्षीचेच हे जीणं डोंगरांचं………..!!!

साऱ्या जगाला  एक जगणं शिकवणारे ह्या डोंगराचं जगणं…..

जीवन जगायचं असतं सुख-दुःखाचं गणित ध्यानात ठेवूनच

जसा पावसाळा आहे ..म्हणजे सुखचं सुख आहे…

तसं दुखही आहेच..जसा उन्हाळा आहे..

उन्हाळा असतो ते आपल्याला कणखर बनवण्यासाठी….

आलेल्या संकटाना सामोरं जाण्यासाठी…

वेळ आली तर उनही झेलायचं असतं …..थोडा धीर धरायचा असतो..

कारण उन्हाळा हा आपल्याला कायम सोबत करणार नाही..त्यालाही त्याचे आयुष्य आहे…!!!!

अन् पावसाळा असतो ते भरभरून आनंद लुटण्यासाठी..ऊत-मात न करता,

अन् भरभरून आनंद देण्यासाठी……

आपल्या परीने जेवढा आनंद जगाला देता येईल तेवढा देणं..कारण पावसाळाही चिरंतर टिकणारा नसतो…

अन् त्यालाच कदाचित सुख म्हणत असाव………!!!

Entry filed under: Uncategorized. Tags: , , , , .

ह्या जगण्याच्या शाळेत…!! देवा तुलाही हक्क आहे ..!!

4 प्रतिक्रिया Add your own

  • 1. Nagesh Deshpande  |  मार्च 2, 2011 येथे 7:11 pm

    अप्रतिम…

    सुंदर लिहिता तुम्ही…

    उत्तर
    • 2. Atul  |  मार्च 7, 2011 येथे 3:38 pm

      धन्यवाद नागेश…. खूप खूप आभार आपले…. !!

      उत्तर
  • 3. सागर कोकणे  |  सप्टेंबर 19, 2011 येथे 8:05 pm

    मस्त लिहिले आहे…मनापासून

    उत्तर
    • 4. Atul  |  सप्टेंबर 19, 2011 येथे 9:31 pm

      Dhanywad Sagar, Khup abhar…..!!! tumacha blog pan chhan aahe …..!!!

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Trackback this post  |  Subscribe to the comments via RSS Feed


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे


%d bloggers like this: