Archive for मे, 2011
जगदीश खेबुडकर
आज असेच ऑफिस मधून निघायच्या वेळेस २५-३० मिनिटे माझ्याकडे होती, म्हणून म्हटले esakal.com वाचून जावे…महत्वाच्या बातम्या एकदा नजरेखालून घालाव्या ..
असं म्हणून सकाळ पपेर वाचत होतो…..अचानक “जगदीश खेबुडकर यांचे निधन” ह्या बातमीकडे लक्ष गेले…आणि अचानक असे काळजात धस्स झाल्यासारखे वाटले…
एक आपला जवळचा माणूस आपल्यातून गेला असाच वाटले……..आणि काही वेळ मन जरास सुन्न झालं….. ..एक महान गीतकार..त्यांची महानता ती शब्दात कशी मांडता येणार….!!
ज्यांच्या लेखणीतून एकापेक्षा एक सरस गीते लिहिली गेली अश्या जगदीश खेबुडकरांची उणीव तशी भरून निघणे अवघडच..
मला जगदीश खेबुडकर केव्हा पासून कळायला लागले, ते मी आठवण्याचा प्रयत्न केला तर….मी जेव्हा पासून मराठी चित्रपट पाहायला लागलो तेव्हापासून सुरवातीला जेव्हा चित्रपट कलाकारांचे,निर्माते, दिग्दर्शक संगीतकार, गीतकार अशी ज्यांची नाव यायची.. त्यात नेहमी गीतकार म्हणून “जगदीश खेबुडकरांचेचं नाव दिसायचे आणि नंतर प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस त्यांचेच नाव बघायची सवय झाली……..त्यांचे ते गाण्याचे शब्द…आणि त्यांना मिळालेली अप्रतिम शब्दांची साथ….सर्व काही आजही मनाला भावून टाकतात… खरच अशी माणस खूप दुर्मिळ असतात……
त्यांचे निसर्ग राजा ऐक सांगतो’, हे निसर्गगीत असो की “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’ हे भक्तीगीत असो….लावण्या असोत…पिंजरा चित्रपटातील लावण्या असो…..तर भन्नाट आहेत..
कधीही नकळत तोंडावर येतात…आणि मन प्रसन्न करून जातात…..सगळ कसे अप्रतिम..!!!
तर असे हे जगदीश खेबुडकर…एक महान गीतकार आज आपल्यात नाहीयेत….पण त्यांचे शब्द हे नेहमीच आपल्यासोबत आहेत आणि राहतील..
जाता जाता त्यांचेच शब्द जगणं सांगून जातात…..
“प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना दुसऱ्याच्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिला की, मागे वळून पाहण्याची गरजच नसते”
भावपूर्ण आदरांजली..!!!