Archive for मार्च, 2012

हरिश्चंद्रगड – एक प्रवास

नुकताच गेल्या रविवारी(११ मार्च) हरिश्चंद्र गडावर जाण्याचा योग आला, माझ्या गावापासून जवळ असूनही तिथे जाणे झाले नव्हते आजपर्यंत..म्हणजे तसं मनावर घेतलं नव्हत…

गेल्या काही महिन्यापासून तिथे जाण्यासाठी हालचाल चालू केली होती.. माझ्या मोठ्या बंधूचे सासरे(मामा) आहेत…ते नेहमी असे इकडचे तिकडचे  देव- देव करत असतात, कधी बसने तर कधी स्वत: सायकल वर (जवळचे असेल तर) , नाहीतर असंच कोणी एखादा मित्र भेटला तर मोटारसायकल वर जात असतात…त्यांच्या बऱ्याचश्या फेऱ्या होत असतात..अश्या ठिकाणी.. हरिश्चंद्रगड, अंकाई देवी, डोंगरगण,मढी आणि असेच छोटे-मोठे देव ते करत असतात..हरिश्चंद्रगडाला तर ते ५०-६० वेळा जाऊन आले आहेत..

मागे महिन्या–दोन महिन्यापूर्वी  असेच त्यांना म्हणालो होतो की मला पण हरिश्चंद्र गडावर यायचे आहे, तसं काही नक्की नव्हते की कोणत्या दिवशी जायचे पण..ते म्हटले होते की पाडव्याचा दिवशी किंवा त्याच्या आधी किंवा नंतर जाऊ……

शनिवारी (१० मार्च) ला रात्री त्यांचा एकदम फोन आला आणि  म्हटले उद्या(रविवारी)  सकाळी हरिश्चंद्रगडावर जायचे आहे….मी खरे म्हणजे शनिवारीच पुण्यावरून गावी गेलो होते…अंग जाम झाले होते प्रवासात..अगोदर जायची इच्छा नव्हती होत….पण नंतर विचार केला की..आली आहे संधी तर कशाला सोडायची…एकदा नाट लागले तर परत होणार नाही लवकर जाणे…म्हणून ठरवलं की जायचे…….

रविवारी सकाळी उठलो…जरा उत्साहात….सकाळचे कार्यक्रम उरकून लवकर आवरले….आपली गाडी(बाईक) काढली ९ वाजे पर्यंत मामांच्या घरी पोहचलो…..गुंजाळवाडीला….मी त्यांच्या घरी गेलो तर ते घरी नव्हते…सकाळी–सकाळी गावातल्या देवळात गेले होते…अर्धा तास थांबलो.. ते अर्ध्या तासाने आले..

आता त्यांचे जाणे म्हणजे आपल्यासारखे नसते..उठले की चालले..हरिश्चंद्रगडाचे  बरेचशे लोकं तिथे ओळखीचे आहेत…त्यांच्यासाठी..घरून कांदे,काही भाजीपाला घेतला..आम्हा दोघांच्या दुपारच्या जेवणासाठी चपाती-चटणी पण बांधून घेतली…

९:४५ ला आम्ही दोघे निघालो….ऊन वाढत चालले होते हळू-हळू, तरी पण काही वाटत नव्हते…एक नव्या ओढीने मी गाडी चालवत होतो..इकडच्या तिकडच्या गप्पा मारत….

जातं-जाता मामां मला बरीच माहिती देत होते..

११:३०  वाजेपर्यंत राजूरला पोहचले…तिथून किराणा दुकानातून, देवाला दिवा लावण्यासाठी काही तेल घेतले, अगरबत्ती, खडीसाखर ई. राजूर पर्यंतचा रस्ता मला तसं माहित होता, पण तिथून पुढचा रस्ता मला सगळा नवीन होता..जाताना रस्ता तसं चांगला आहे पण खूप वळणा-वळणाचा आहे आणि अरुंद रस्ता आहे…म्हणून गाडी पण दक्षतेने चालवावी लागते…

असंच तो रस्ता…आजूबाजूला भव्य डोंगर, दरी, ओढे,नाले…. ह्या रस्त्याने सगळे नवीन होते..मी पहिल्यांदाच जात असल्यामुळे…

मामांना पण सगळे रस्ते माहित, मध्ये लागणारे गाव सगळे काही माहित होते..

सूर्य डोक्यावर आलेला होता.. असेच मजल-दरमजल करत एकदाचे १२:०५ वाजता पोहचलो.. पाचनई ह्या गावी…हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी…..तिथेच एका मामांच्या ओळखीच्या घरी..आमच्या घरून आणलेले, कांदे, काही भाजी दिले, तिथे पाणी घेतले… ५-१० मिनिट थांबलो असेल….

हेच ते पाचनईगाव…गडाच्या पायथ्याशी, घरं तशी कमीच आहे ह्या गावात.

दुपारचे १२-२५ झाले होते. आता आमची मोठी कामगिरी बाकी होती…आम्हाला गड चढायचा होता..आमच्या पिशव्या घेतल्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाच्या भाकरी घेवून…..आमची गडाची वाट धरली..

हीच ती वाट गडाकडे जाणारी आणि..समोर दिसणारा गड….

कळसूबाई हरिशचंद्र गड अभयारण्य ची पाटी  आमच्या स्वागताला…अभयारण्यात भ्रमंती करताना ….ह्याच्या खालच्या ओळींकडे(सूचना) लक्ष न देता आम्ही पुढे निघालो…

हीच ती सुरवातीची वाट….आमच्यापुढे..तेथीलच स्थानिक तिघे जण चालले होते ते तिकडे गडाच्या दुसऱ्या बाजूला(जुन्नर तालुका परिसर) कामासाठी चालले होते…..एकजण तर त्यातला  अनवाणीच होता…..आणि ह्या लोकांचे,ह्यांच्या कष्टाचे.. जेवढे कौतुक करावं तेव्हढ कमीच होते…

सलाम ह्या अनवाणी पायांना…आणि त्या पायांच्या धुळीला..!!!

थोडीशी वाट चढल्यानंतर मागे हे दृश्य दिसत होते…सुरवातीला दम लागत होता…धापा टाकूनच पाय टाकत होतो…पण गड चढणं चालूच होते…

अजून थोडे वरती चढल्यानंतर………दिसणारा पायथा….अजूनच बारीक होत चाललेले…!

ही वाट खाच-खळग्याची….

ह्याच त्या डोंगर- कपारीतून वाट काढत रस्ता पार करतोय…..

ह्याच डोंगर –कपारीतून चालत…हळू –हळू आम्ही वाट सर करत होतो.

आता मात्र आम्ही थोडे थकलो होतो….म्हटले थोडा आराम करू..आणि आम्ही ह्या डोंगर-कपारीच्या सावलीत थांबलो..

हेच माझे सहकारी मामा….माझ्यापेक्षा कितीतरी वयस्क…पण बघा तो उत्साह…….चेहऱ्यावर थकवा अजिबातही नाही…….आणि असे कित्येक वेळा गड चढले आहेत हेच ते मामा…

मी..

असंच वाट काढत काढत…आम्ही गड चढतो आहे….

समोर दिसणारा गड…

वाटेवर…बरीचशी झाडे.आहेत…त्यावर लावलेल्या पाट्या…..झाडांच्या नावांच्या…आपल्या माहितीसाठी.

आमचा पायथा आता दिसेनासा झाला आहे…

गडावर शेळ्या वळणारी पोरं…..ह्यांच्या शाळा म्हणजे हेच….

असं मजल-मजल करत….आम्ही एकदाचे गडावर पोहचलो…१२:२५ ला निघालो ते…जवळ-जवळ १:३५ झाले होते….एक तास भर…चालल्यानंतर…आम्ही इथे पोहचलो.

हरिहरेश्वर मंदिर……पण इथे जाण्याअगोदर….आम्ही केदारेश्वर मंदिरात गेलो…

मुळा नदीचा उगम ह्याच मंदिरापासून…!!

इथे शिवलिंग ही एका गुहेत आहे….जिथे चाहुबाजूने पाणीच पाणीच आहे…चार खांबाच्या मध्ये हे शिवलिंग आहे…चार पैकी एकच खांब सध्या आहे..बाकी सगळे मोडकळीस आले आहे..

मामांनी इथे(एकदम थंड पाण्यात) अंघोळ करून….शिवलिंगाला हार, फुले, वाहिली…मनोभावे पूजा केली…

ह्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात आलो…हरिहरेश्वराच्या

ह्या मंदिरात मामांनी सर्वात प्रथम एक झाडू आणला सगळी साफ-सफाई केली…मी ही साफ सफाई करण्यास मदत केली…एवढा निवांत वेळ देवासाठी कधी देता येतो…अश्या निवांत वेळी गेल तरच…

आम्ही आणलेली फुले ह्या शिवलिंगावर वाहिली…हा.हा.किती सुंदर हा क्षण..

गर्दीच्या मोसमात..(शिवरात्रि च्या) इथे क्षणभर उभे राहल्या पण भेटत नाही…तिथे आम्ही चांगले निवांत बसलो होतो..सगळे शिवलिंग धुवून फुले, अगरबत्ती, दिवा लावून मनोभावे…शिवशंकराची…पूजा केली… किती….अमूल्य तो क्षण…..

पिण्याचे पाण्याची कुंडी….इथे स्वच्छ पिण्याचे पाणी आहे…जे कधीच आटत नाही.

बाजूला असणारे पाण्याची कुंडी..कदाचित येथील पाणी पूर्वी पिण्यायोग्य असेल..पण आता ते पाणी खराब झाले आहे.

गडावर असणाऱ्या भरपूर गुहा…ह्या गुहा अश्या बनवलेल्या आहे की इथे लोक राहू शकतात…..

आता इथून वरती असणारे….तारामांची(तारामती गड). सर्वात उंच टोक…मामांनी मला विचारले की तारामांची ला जायचे का….मी थोडा विचार केला..आणि म्हंटल आता आलो आहे तर जाऊ…..आजून ३०-४० मिनिटे…वरती तारामांची गड आहे…

हरिश्चंद्र गडावर असंच एक तास भर थांबलो असेल.नानातर आम्ही २:३० च्या दरम्यान तारामांची ला जायला प्रस्थान केले…

तारामांची ची वाट..गर्द दाट झाडी असलेली वाट २०-२५ मिनिट चाललो असेल….तारामान्चीच्या अर्ध्या वाटेवर आलो तर भूक लागली होती…म्हणून बरोबर आणलेली भाकर सोडली…

चपाती अन शेंगदाण्याची चटणी…मस्त झाडाची गार सावली…आहाहा अप्रतिम जेवण झाले..जिथे जेवण करायला बसलो तिथून एका बाजूला पिंपळगाव जोगा धरणाचे शेवटचे मूळ(टोक)  दिसत होते..

आणि बाजूलाच माळशेजचा घाट पण दिसत..होतं..

घाटातल्या गाड्या काडीपेटीसारख्या दिसत होत्या..

१५-२० मिनिटे जेवण आणि थोडा आरमा केला…३:२० झाले होते…..राहिलेला टप्पा पूर्ण करण्यासाठी….आम्ही निघालो…आता..हळू हळू करत….आम्ही वरती पोहचलो..अजून १०-१५ मिनिटात….

तो हा जोराच्या वाऱ्यावरती फडकणारा भगवा झेंडा….

हा झेंडा बघून नकळत काही ओळी सुचल्या मनात..

करितो मनाचा मुजरा तुला
..फडकत राहा असाच तू रे……
अभिमानाने फुलून येते छाती अमुची..
तुला असं बघून…||

येवो तुझे सत्व अमुच्या अंगी.
नसे गर्व…अंगी..
नको विसर पडू देऊ कर्तव्याची..
असू दे लीन, नम्रता मनी सदा…||

ह्या झेंड्यापासून उजवीकडे ….हरिश्चंद्र गड दिसत होतं….तर डावीकडे माळशेज परिसर्…पूर्वेकडे मुंबई कडचा भाग…असं म्हणतात की इथून  आख्खी मुंबई दिसते…पण मला वाटत अख्खी मुंबई नाही..पण रात्रीच्या इथे कल्याण-मुरबाडचे दिवे नक्कीच चमकतात…..

मुंबईचा परिसर!!

माळशेजचा परिसर!!

कोकणकडा..आणि आजूबाजूचा परिसर..!!

वर तारामांची वर असलेली शिवलिंग….दगडात कोरलेली…

गडावर मामा…

१०-१२ मिनिट आम्ही वरती होतो……आणि ह्या ज्या भावना होत्या त्या  शब्दात वर्णन करणं अवघड आहे…अप्रतिम ..किती उंचावर आलो ह्याची काहीच कल्पना नव्हती…पण नंतर जेव्हा वाचले तेव्हा कळले की ह्या गडाची उंची ४६७१ फूट आहे…… असाच ३:४० च्या दरम्यान आम्ही परतीचा प्रवास चालू केला…उतरताना  पाय लट-लट कापरत होते म्हणून एक काठी आधाराला घेतली…. हळू हळू आम्ही गड उतरलो…मनात एक आनंद घेवूनच..आणि परत ह्या गडावर यायचे हा निश्चय करूनच….!!

अजून एक शेवटचे लिहायचे राहिले, राजा हरिशचंद्र हा खूप सत्वशील होता,येथील गडाचे,येथील हवेचे एवढे सत्व आहे की, की आपले बरेचशे आजार आपोआप बरे होतात, असे मामा सांगत होते.आणि मला पण हा अनुभव आला..कारण ह्या गडावर जायच्या जवळ-जवळ १५ दिवस मला डोळ्याचा त्रास होत होता.(म्हणजे रांजणवडी  झाल्यासारखे वाटत होते,एक डोळा सुजला होता.) मी अगोदर डोळ्यात मेडिकल मधून औषध आणून डोळ्यात टाकले पण होते, पण एकदा बरे होऊन ते परत झाले होते..आणि मी ठरवलं होते की रविवारी ११ मार्चला डॉक्टर ला दाखवू म्हणून.. पण ११ मार्च ला मी नेमका हरिश्चंद्रगडावर आलो.. आणि मला नवल वाटले की माझे डोळे पूर्ण बरे झाले ..दुसऱ्या दिवशी.. …!!आणि मला वाटत की हा पूर्ण ह्या गडावरच्या वातावरणाचा,हवेचा परिणाम आहे..!!

हरिश्चंद्र गडाबद्दल माहित खालील लिंकवर आहे (साभार:विकिपेडिया)

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1

मार्च 21, 2012 at 11:40 सकाळी 5 comments

खवचट

(भाग १)

खवचट!!! खवचट ..हा शब्द पण उच्चारताना नेमका ‘च’ वरच जोर द्या..तसं जे खवचट लोकं असतात त्यांना ह्या गोष्टी सांगायची गरज नाहीये…तर आता खवचट ह्या शब्दाबद्दल काय लिहिणार…म्हणून अश्या माणसावर लिहावं..जे ह्या शब्दाचा पुरेपूर उपयोग करून घेतात…आणि बाकीच्या लोकांना पण त्याचा पूरेपर अनुभव देतात.

ज्यांच्यावर ह्या खवचटपणाचा प्रयोग होतो (किंवा बळी पडतात)जे ह्यांच्या खवचटपणाला काहीच प्रत्युतर देत नाहीत.. त्यांच्या तोंडाकडे पाहवत नाही….बिचारे…

पण दुसरा पण प्रकार आहे इथे……अगदी खवचट ला दुसरा खवचटच भेटला तर मात्र मग मज्जा येते…त्यातून एकतर भयंकर भांडण होते..नाहीतर काहीतरी विनोद तरी होतात….आणि ह्या खवचट लोकांत तिसरा भेटला तर अगदी विचारू नका…..

असेच काहीतरी खवचट लोकांचे खवचट उदाहरणे इथे देत आहेत…

प्रसंग १.

काही दिवसापूर्वी बसने प्रवास करत होतो…एका बसस्थानका वर बस थांबली…बसमधले प्रवासी काही उतरले, काही चढले…त्या प्रवासामागून लगेच नेहमीप्रमाणे वेफर्स, फरसाण,पाणी,फळं,उसाचा रस,चिक्की,  ई. जे काही असले ते घेवून चार-पाच जण आले…

            “चला वेफर्स,बिस्कीट….”

            “चला पाणी, पाणी, थंडगार पाणी…”

            असं सगळ्यांच ओरडणं चालूच होते..काही प्रवासी त्यांना जे पाहिजे होते ते घेत होते.. .

            तो पाणी बाटली वाला माझ्या सीट जवळ आला आणि ओरडू लागला ‘पाणी,पाणी म्हणून..’

             तेवढ्यात माझ्या जवळ बसलेले गृहस्थ…३०-३२ वय असलेले जाड भिंगाचे चष्मा घातलेले….त्यांना ह्या पाण्यावाल्याने विचारले की

            “देऊ का पाणी बाटली साहेब?”

साहेब काही एक नाही दोन नाही….त्यांनी लगेच आपल्या बॅगमध्ये हात घातला…चांगली १.५ लिटरची पाण्याची बाटली काढली..आणि घटाघटा चार-पाच घोट पाण्याचे घेतले….त्या बाटली वाल्याचा समोरच…आणि पाणी पिवून झाल्यानंतर  मोठा आवाज काढला घश्यातून… आणि एक कटाक्ष टाकला त्या पाण्यावाल्याकडे…..

बिचार तो पाण्यावला काय करणार …बिचारा निघून गेला पुढे…….मला आलेले हसू आवारात नव्हते….आणि ह्या माणसाला जसा आपण पानिपतची लढाई जिंकलो असंच वाटत होते……  आता काय बोलणार?

प्रसंग २.

कुठल्यातरी एका सरकारी ऑफिसच्या प्रसाधनगृहात दोन गृहस्थ आपापले विधी उरकून, त्या प्रसाधानगृहात असलेला तुटका आरश्यासमोर तयार होत असतात.

आरसा छोटा असल्यामुळे एका मागे एक उभे असतात.दोघांचेही वय ४०-४५ च्या दरम्यान असते, दोघेही एकमेकांना अनोळखी असतात. दोघांमध्ये एकच फरक असतो की,

एकाच्या डोक्यावर दाट  केस असतात त्यांचे नवा खंडेराव!. आणि दुसऱ्याच्या डोक्याचे पूर्ण विमानतळ   व्हायचे थोडेसेच बाकी असून, चार-पाच नावाला केस असतात, त्यांचे नाव तात्याराव!

तात्याराव आपले आरश्यात आपला चेहरा न्याहाळत होते..

तर तेवढ्यात ते खंडेराव खिश्यातून एक कंगवा काढतात… ..आरश्यासमोर होतात, आपले

केसाची स्टाईल मारत भांग पाडू लागतात…एक जोरदार कटाक्ष तात्यारावांच्या असलेल्या टकल्याकडे आणि उरलेल्या केसांकडे टाकून!!!

तात्यारावांनी हा खंडेरावाचा हा खवचटपणा  ओळखला…….ह्यावर तात्याराव शांत बसतील ते कसले…..ह्यांनी काय करावं…..

 ह्यांनी पण आपल्या खिश्यातून एक बारीकसा कंगवा काढला…..आणि एक जबरदस्त खुन्नस खंडेरावांना  दिली…..आपल्या चार-पाच केसांमध्ये कंगवा फिरवला…….आणि असे जोरात आवाज करून हसले की खंडेरावचा चेहरा बघण्यासारखा होता……खंडेरावांनी आपला कंगवा हळूच खिशात ठेवला व चालते झाले….. ह्याला म्हणतात…खवचटास महाखवचट!!!!

प्रसंग ३.

      भर उन्हात १२ च्या सुमारास दोघेजण मोटारसायकल वर चालले आहेत, गर्दीचा रस्ता, पायी चालणारेही थोडेफार लोक आहेच.ह्या मोटारसायकलवर जाणारे दोघे… ह्यांच्या मोटारसायकलीची पुढील लाईट लागला आहे……

गर्दीतून हे रस्ता काढत होते….पायी चालणारे माणसंही होतीच, त्यातच एक माणूस पायी चाललेला..थोडासा त्रस्त झालेला..आधीच उन्हाचा त्रास….त्यात ह्या मोटारसायकलीची लाईट डोळ्यावर चमकली…..ती मोटारसायकल जेव्हा जवळ आली ….

तेव्हा त्या मोटारसायकलस्वराला लाईट बंद करायला सांगावी म्हणून, हे पायी चालणारे गृहस्थ  हाताचा इशारा करून म्हटले…..

“साहेब ….लाईट चालू आहे….” 

तर त्या महाशयांचा प्रतिसाद बघा..

 “जाऊदे ना भो……….माझ्या बापाला ह्या लाईटच काही बिल येत नाही…………!!! “ असं खवचट  बोलून…पुढे निघाले….

 आता ह्या खवचटपणाबद्दल काय म्हणावे…..?????

(क्रमश:)

मार्च 15, 2012 at 6:53 pm यावर आपले मत नोंदवा


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे