देवा तुलाही हक्क आहे ..!!
मार्च 18, 2011 at 11:04 pm १ प्रतिक्रिया
एक माणूस म्हणून आज कुठेतरी देवाच्या भक्तीत आपण कमी पडतो आहे असे वाटतयं..कारण माणसावर संकटं, दुःख आली का मगच देवाचा धावा करायचा ही प्रवृत्ती वाढत चालली आहे ..मग अभिषेक, पूजा,महापूजा, शांती करणे इत्यादी अनेक कार्यक्रम केले जातात .. मग तिथे पाहिजे तेवढा पैसा पण ओतला जातो..पण रोक काही वेळा देवासाठी,देवाची भक्ती करण्यासाठी माणसाला वेळ नाहीये…..
जेव्हा देव,निसर्ग आपल्याला भरभरून देतो तेव्हा आपण देवाचे क्षणभर आभारही मानत नाही का,पण रोज १५-२० मिनिटे वेळ देवासाठी द्यायला पण वेळ मिळत नाही …मिळत नाही म्हणण्यापेक्षा वेळ काढला जात नाही ……ह्यामुळेच जगात भूकंप,पूर,दुष्काळ,त्सुनामी वगैरे ही संकट येतात..ती कदाचित ह्याचीच फळ असावीत ….म्हणूनच मला वाटत की देवाला हक्क आहे त्रास देण्याचा, दु:ख देण्याचा…हेच काहीतरी शब्दात मांडण्याचा प्रयत्न..!!!
देवा तुलाही हक्क आहे
थोडसं रडवण्याचं…
कारण जेव्हा मी ह्या जगात येतो,
जेव्हा मी दिवसभर खेळत असतो
मस्ती करत असतो..हसत असतो…..
मी ह्या जगात आलो ते फक्त तुझ्या तुझ्या कृपेने हेही मला माहित नसतं..
– एक बाळ
देवा तुलाही हक्क आहे
चालत्या गाडीला बंद पाडण्याचा..
कारण हीच गाडी जेव्हा धावत असते तुझ्या कृपेने..
तेव्हा नाही मानत मी तुझे आभार.
–एक वाहनचालक
देवा तुलाही हक्क आहे
दिवसभर उन्हा-तान्हात वाट चालणारा मी
मला मग तहानेने व्याकुळ करण्याचा…
कारण त्याशिवाय तर मला “पाणी जीवन आहे ” ह्याचा अर्थ कळत नाही
-एक वाटसरू
देवा तुलाही हक्क आहे
कधी-कधी आम्हाला नापास करण्याचा
कारण वर्षभर तू आम्हाला माहीत नसतो
माहित होतो ते फक्त परीक्षेच्या वेळेसच..
-एक विद्यार्थी
देवा तुलाही हाक आहे
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पाडण्याचा
कारण तू जेव्हा भरभरून देतो आम्हाला,
तेव्हा आम्ही क़्वचितच देवळात येऊन तुला नारळ फोडतो..
-एक शेतकरी
देवा तुलाही हक्क आहे
जेव्हा सुट्टी पाहिजे असते,
तेव्हा ती न मिळवून देण्याचा
कारण जेव्हा आम्हाला सुट्टी असते
तेव्हा आम्ही सिनेमाला जाण्याला पहिली पसंती देतो
मंदिरात जायला आम्हाला वेळ नसतो.
-एक नोकर
देवा तुझाही हक्क आहे
कधी-कधी माझी अन् तिची भेट न होऊ देण्याचा..
कारण आम्ही दोघं जेव्हा भेटतो तेव्हा आम्हाला सारं जग विसरायला होतं..
अगदी तुला सुद्धा..
-एक प्रेमी
देवा तुलाही हक्क आहे
आख्खा समुद्र पालथा घालूनही
एकही मासा न मिळून देण्याचा
कारण जेव्हा टोपलं भरून मासे मिळतात तेव्हा
मी क्वचितच असं म्हणतो देवा हे फक्त तुझ्यामुळेच
-एक मासेमारी करणारा
देवा तुझाही हक्क आहे
म्हातारपणी नको ते आजार देण्याचा,
कारण आयुष्यभर जनतेच्या सेवेच्या नावाखाली,
जनतेचेचं पैसे खिशात टाकले,अन् जनतेलाच लुबाडण्याचे काम केले,
तेव्हा नाही भीती वाटली आम्हाला तुझी..
-एक भ्रष्ट राजकारणी
देवा तुझाही हक्क आहे
आयुष्यात दु:ख देण्याचा ,संकट देण्याचा
कारण हीच दु:ख, संकटं आम्हाला बळ देतात
जगण्याला ..अन् जगाला गवसणी घालायला..
अन् देवा हा तुझाच हक्क आहे
जीवन हे जगता-जगता कोणत्या क्षणी संपवायचं….!!!
-एक माणूस
Entry filed under: Uncategorized. Tags: कविता, काव्य, दु:ख, देव, संकटं.
१ प्रतिक्रिया Add your own
प्रतिक्रिया व्यक्त करा
Trackback this post | Subscribe to the comments via RSS Feed
1.
Apurva | मार्च 22, 2011 येथे 4:58 pm
Aprateem! Khup chaan lihilayt aapan. Aawadla.