मराठी प्राथमिक शाळा
असं आयुष्य जिथे फक्त माहित असतं
त्याला फक्त घर आणि शाळा
ज्या घरी त्याला नसतं कसलं टेन्शन
आई-वडील म्हणजे आपला ईश्वर ..आपला सारं काही पाहणारे..!!
आणि ज्या शाळेत असतात त्याचे फक्त दोनच शत्रू..
एक म्हणजे अभ्यास आणि दुसरे म्हणजे त्याचे गुरुजी ..
झालेच तर त्याची भावंड आणि गल्लीतले पोरं …भांडण करण्यासाठी…कसल्याही शुल्लक कारणावरून!!
सुट्टीच्या दिवशीच भरभरून गृहपाठ देणारे गुरुजी..
अ आ इ ई..वदवून घेणारे अन् पाढे पाठ करून घेणारे गुरुजी…कित्येकदा
नाही जमलं तर आहेच हातावर छडी अन पाठीत धपाटे….!!
अश्या गुरुजींची नुसती आठवण जरी काढली तरी चीड आणणारे..
अशातच चौथी कधी पार होते कळतच नाही…
आणि मग पुढे असते ती पाचवी..
माध्यमिक शाळा
ह्या शाळेतही त्याचे शत्रू बदलत नाही
फक्त त्यांचे स्वरूप बदलतं…..
अभ्यास नावाच्या शत्रुमध्ये असते ते इंग्रजी शिकण्याचं आणि इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करणं..
गणितं सोडवण….विज्ञानाचे सिद्धांत, भूमितीचे प्रमये पाठ करणं….
ह्या शत्रूला मित्र म्हणजे सर…..मित्र म्हणण्यापेक्षा अभ्यास नावाचा शत्रू अस्तित्वात असूच शकत नाही ह्यांच्याशिवाय…!!
इथेही त्यांच्या जोडीला असतात ते छडी आणि धपाटे…!!
ह्यांच्याच परिश्रमामुळे(सरांच्या छडी,धपाटे..इ.मुळे)दहावी होतो हा चांगले मार्क मिळून..
आणि मग सुरु होते कॉलेज जीवन..
जुनियर कॉलेज
शाळेत असेपर्यंत कॉलेजला कधी जाईल असं व्हायचं…
कॉलेजच जीवन, तिथले वातावरण सगळ असं की मन अगदी हुरळून जायचं.
जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा कळायला लागल कॉलेजचे जीवन……
वर्गात थांबण्यापेक्षा वर्गाबाहेरच जास्त थांबणं …टवाळक्या करणं…..
दफ्तर न्यायचा काही विषय नाही…असलीच तर एखादी वही असायची….
त्याला कारणही तशीच…
कॉलेजमधले सर वर्गामध्ये शिकवण्याचा कंटाळा करतात …
तेच सर मात्र क्लासेसला जीव तोडून शिकवायचे…..
हे पाहिल्यानंतर मात्र चीड यायची…..आणि मग आठवण यायची ती शाळेतल्या गुरुजींची अन सरांची!!
कितीही वेळा पाढे चुकला तरी त्याचे गुरुजी जीव तोडून पाढे शिकवायचे…
नव्या-नव्या पद्धती सांगायचे पाढे पाठ करण्याचे……
अन न कंटाळता पाढे पाठ करून घ्यायचे…आता त्यांची मेहनत आठवली का त्यांचं मोठेपण समजायचं.
कॉलेजला मात्र कसलाच मार नसायचा …
इथे मात्र शत्रू बदलले होते…
कॉलेजच्याच एखाद्या पोरीवरून त्याच्याच एखादा जिगरी मित्र त्याच्याशी बोलत नसतो..
नाहीतर एखादा उगाचच भाईगिरी करत त्याला धमक्या द्यायचा असतो..
करण फक्त एखादी पोरगी..!!!!
अशातच बारावी होते…अन मग चालू होतो आणखी एक प्रवास…..
सिनियर कॉलेज…..
इथे शिकवणे हा धर्म नसतो..
आणि शिकवले तरी त्याच्याकडे लक्ष देणे म्हणजे पाप असते…
मग काय इथंही चालू होते तेच ते जगण ….कॉलेजला येण..नुसतं नावाला..
जेवढे जमतं तेवढे शिकणं स्वतःहून …..बाकी सोडून देणे.
इथेही शत्रू असतात,
आतापर्यंत सोबत असणारे गल्लीतले मित्र ,गावातले मित्र बरोबर नसतात..
सगळ काही नवीन वातावरण असतं.. त्यांच्याशीच जमून घेणे अवघड असतं..
तरीही त्यात हा जगणं शिकतो…नव्या मित्र-मैत्रिणी करतो…..
जगण्याचा आनंद शोधत असतो,
असाच सगळ पुरं करत हा होतो ग्रज्युएट!!!
मग सुरु होते खर जीवन
आतापर्यंत वाटत होते कधी हे शिक्षण सुटेल म्हणून …
जेव्हा सुटतं तेव्हा चालू होते जगण्यासाठी धडपड…
नोकरीसाठी वणवण…..
जीवनातल्या जबाबदाऱ्या अंगावर पडू लागल्या की…
सारं महत्व कळतं आपल्या आई-बापाचं……त्यांनी घेतलेल्या कष्टांच!!!
आणि मनोमन वाटतं परत घेऊन चला मला त्याच
मराठी शाळेत अन् त्याच माध्यमिक शाळेत…..
…….जिथे मार बसला तरी चालेल म्हणून…
जिथे बघायचे आहे मला जीव तोडून शिकवणारे गुरुजी अन् सर….
अन् शाळा सुटल्यावर आईच्या खुशीत मला माझी स्वप्न रंगवायची आहेत…
उद्याची……!!!
अन वडिलांच्या धाकाखाली राहूनही दंगा करायचा आहे….
तरीही मला तेच जीवन जगायचे आहे…
आजची अन उद्याची कसलीही चिंता नसलेली…मनसोक्त जगायचं आहे…. ह्या जगण्याच्या शाळेत…!!

Posted by gaurav on फेब्रुवारी 19, 2011 at 12:43 सकाळी
apratim……konihi sahaj relate karu shakel ashi kavita.
Posted by Kadambari Ketkar on जानेवारी 4, 2012 at 2:55 pm
Khupach Chan, Apratim, Vachnaryala aaplyavarach kavita keliye asach vatel.
Posted by Atul on जानेवारी 5, 2012 at 8:18 pm
Dhanywad Kedaambari.!!
Posted by mehul patil on जानेवारी 21, 2012 at 10:21 pm
mala khup aavdl
Posted by Atul on जानेवारी 23, 2012 at 3:00 pm
Dhanywad Mehul!!